Posts

Showing posts from January, 2022

आदिलशाही आणि स्थापत्य

Image
आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period) प्राचीन दाल्भ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले ! दाभोळ बंदरातून अरबी घोडे, मिरी, डिंक, कापूर, लवंग, रेशीम, अत्तरे, रत्ने, हस्तिदंत, प्रवाळ, शिसे, कापड, तांदूळ अशा अनेकविध मालाचा व्यापार चालत असे.  आदिलशाहीतच दाभोळला एक सुरेख मशीद  उभी राहिली. त्यामुळे आदिलशाही स्थापत्यशैलीबद्दल महाराष्ट्रात कुतूहल निर्माण झाले. मुस्लिम स्थापत्याची सुरुवात आदिलशाहीच्या स्थापनेआधीपासून, मूळ बहामनी राजवटीपासून दख्खनमध्ये झाली होती (इसवी सन 1347). उत्तर भारतातील तुघलक शैलीचा प्रभाव त्या शैलीवर सुरुवातीला आणि इराणी शैलीचा प्रभाव नंतर दिसून येतो. बहामनीची राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली गेली, त्या स्थित्यंतरातही योगायोगाने आलेल्या तुघलकी ते इराणी शैलीचा प्रवास दिसतो. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या जाणून घ्या... तुम्हालाही वाटेल अभिमान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या जाणून घ्या... तुम्हालाही वाटेल अभिमान महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत.       छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजां...

राजेसाळुंखे चाळुक्य नरेश विक्रमादित्य षष्ठ 👇👇👇 मराठी विक्रम संवत निर्मित राजा

Image
राजेसाळुंखे चाळुक्य नरेश विक्रमादित्य षष्ठ 👇👇👇 मराठी विक्रम संवत निर्मित राजा   राजेसाळुंखे चाळुक्य नरेश विक्रमादित्य षष्ठ मराठी विक्रम संवत निर्मित राजा _____--_/\_--_____ _____..................... सतीशकुमार सोळंके-देशमुख, मराठी नवीन वर्षाची लवकरच सुरुवात होत आहे. दख्खनातील नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा असतो. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर कल्याण नरेश षष्ठ विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य राजाने आपल्या विस्तीर्ण पसरलेल्या साम्राज्यासाठी 'चाळुक्य विक्रम संवत' हे नवीन विक्रम संवत सुरू केले होते. ------------------------- साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास ------------------------- कल्याणीच्या उत्तरकालीन साळुंखे चाळुक्यांच्या शाखेतील हा अत्यंत महापराक्रमी आणि वैभवसंपन्न राजा होऊन गेला. सम्राट विक्रमादित्याने ५१ वर्षाहून अधिक काळ निम्म्याधिक भारतावर स्थिर शासन करताना अनेक इतिहास रचले. यातील अनेक पराक्रम आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहेत. त्या व्यतिरिक्त या कार्यकाळात अजून त्यांनी मरू (राजस्थान), माळवा, चेर (केरळ), चोळ, कलिंग आणि बंग आदी कित्येक राजांचा पराभव कर...

राजा तैल साळुंखे चाळुक्याने वाक्पती परमारास 👇👇👇 रणात जिवंत पकडून लाकडी पिंजर्‍यात कैद केले

Image
राजा तैल साळुंखे चाळुक्याने वाक्पती परमारास 👇👇👇 रणात जिवंत पकडून लाकडी पिंजर्‍यात कैद केले   राजा तैल साळुंखे चाळुक्याने वाक्पती परमारास रणात जिवंत पकडून लाकडी पिंजर् ‍ यात कैद केले ------------------- ------------------- सतीशकुमार सोळंके-देशमुख @.............. बादामी साळुंखे चाळुक्यांचा थेट वंशज असलेल्या आणि सावळ्या वर्णाचा, रंगाचा असलेल्या तैलप साळुंखे चाळुक्याने राष्ट्रकूटांच्या राजसत्तेचा अस्त करून दक्षिणेत उत्तरकालीन चाळुक्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. ------------ ============== साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास ============== ------------ "साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास" या लेखमालेतील आजच्या भागात आपण माळव्याचा राजा वाक्पती परमार आणि साळुंखे चाळुक्य नरेश तैलप या दोघांच्या सत्ता संघर्षावर आणि साम्राज्य विस्तारावर दृष्टीक्षेप टाकणार आहोत. तैलप साळुंखे यास महाराजाधिराज परमेश्वर परमभट्टारक समस्तभुवनाश्रय ही सार्वभौमत्व दर्शक आणि भुजबल वीरनारायण, भुवनैकमल्ल व अाहवमल्लदेव ही पराक्रम दर्शक बिरुदे धारण केली. तर वाक्पती परमार याने आपणास श्रीवल्लभ व पृथ्वीवल्लभ या पदव्य...

तैल चाळुक्याने माळव्याचा राजा मुंज परमारास 👇👇👇 राजमार्गावरून धिंड काढून वधस्तंभापाशी शिरच्छेद केला

Image
तैल चाळुक्याने माळव्याचा राजा मुंज परमारास 👇👇👇 राजमार्गावरून धिंड काढून वधस्तंभापाशी शिरच्छेद केला   तैल चाळुक्याने माळव्याचा राजा मुंज परमारास राजमार्गावरून धिंड काढून वधस्तंभापाशी शिरच्छेद केला ------------------- ------------------- सतीशकुमार सोळंके-देशमुख @.............. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य नरेश तैल याने युद्धात रणामध्ये जिवंत पकडलेल्या माळव्याचा राजा मुंज परमार यास बंदी बनविले. लाकडाच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवले. तदनंतर सेवकाकरवी काढण्यांनी बांधून दारोदार भिक्षा मागत हिंडवले, राजमार्गावरून त्याची धिंड काढून वधस्तंभापाशी नेऊन त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मुंडके काढून त्याला दह्याने भिजवून ते अंगणात लटकत ठेवले. ही घटना दहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. ------------ ============== साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास ============== ------------ सार्वभौम चक्रवर्ती सम्राट तैलप साळुंखे चाळुक्याने माळव्याच्या राजा वाक्पती अर्थात मुंज परमार यास युद्धामध्ये रणांगणात राजबंदी बनविल्यानंतर एका लाकडी पिंजऱ्यात कोंडून ठेवले. हे आपण "साळुंखे राजव...

प्राचीन सप्तश्री मंडळ' जगातील सर्वात प्राचीन कालगणना 👇👇👇 युधिष्ठिर कालगणनेनंतर प्रसिद्ध कालगणना मल्ल वंशीय सातवाहनांची!

Image
प्राचीन सप्तश्री मंडळ' जगातील सर्वात प्राचीन कालगणना 👇👇👇 युधिष्ठिर कालगणनेनंतर प्रसिद्ध कालगणना मल्ल वंशीय सातवाहनांची!   प्राचीन सप्तश्री मंडळ' जगातील सर्वात प्राचीन कालगणना युधिष्ठिर कालगणनेनंतर प्रसिद्ध कालगणना मल्ल वंशीय सातवाहनांची! ------------------- ------------------- सतीशकुमार सोळंके-देशमुख @.............. प्राचीन काळी भारत भूमीवर सप्तर्शी संवत सुरू होते हे प्राचीन इतिहासाला अभ्यासल्यानंतर माहीती होते. यावरून भारतातील प्राचीन काळातल्या ऋषीमुनी आणि ज्योतिषांच्या खगोल शास्त्रातील अभ्यासाविषयीचे प्रगल्भ ज्ञान लक्षात येते. अवकाशातील तारांगणात असलेले सप्तर्षी हे निरनिराळ्या नक्षत्रातून २७०० वर्षांमध्ये एक परिभ्रमण पूर्ण करतात. प्रत्येक नक्षत्रात ते शंभर शंभर वर्ष राहतात. याचाच अर्थ तारांगणातील सप्तर्षी मंडळ या कालगणनेचा खरा मूळ गाभा आहे. ------------ श्लोक : --------- आसन्मघासु मुनय: शासति पृथ्वीं युधिष्ठिरे नृपती। षड्द्विकपंचद्वियुत: शककालस्तस्य राज्ञश्च ॥ एकैकस्मिनृक्षे शतं शतं ते वर्षानाम्। प्रागुदयतोप्यविवरादृजून्नयति तत्र संयुक्ता:॥ ------------- वरील श्लोकाचा अर्थ...

भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमारस दुर्गात कोंडले 👇👇👇 मदतीला आलेल्या राजास ठार केले; जगद्देव शरण आल्यावर सोडून दिले

Image
भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमारस दुर्गात कोंडले 👇👇👇 मदतीला आलेल्या राजास ठार केले; जगद्देव शरण आल्यावर सोडून दिले   भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने जगद्देव परमारस दुर्गात कोंडले मदतीला आलेल्या राजास ठार केले; जगद्देव शरण आल्यावर सोडून दिले ------------------- ------------------- सतीशकुमार सोळंके-देशमुख @.............. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्य सत्तेवर आल्यानंतर त्याच्या महामंडलेश्वर अर्थात सामंत असलेल्या जगद्देव परमार याने इतर काही राजांच्या साह्याने भूलोकमल्लावरवर स्वारी केली. तेव्हा भूलोकमल्ल साळुंखे चाळुक्याने रणात उतरून जगद्देव परमाराशी स्वतः युद्ध करून त्यास सह्यगिरीत पिटाळून लावले, इतकेच नाही तर तेथील किल्ल्यात कैद करून ठेवले. --------------- ============== साळुंखे राजवंशाचा वैभवशाली इतिहास ============== --------------- अभिलेखात पुढे असेही म्हटले आहे, की साळुंखे नरेश भूलोकमल्लाच्या कैदेतील या मालवराजाला म्हणजेच याचा अर्थ जगद्देवाला सोडविण्यासाठी दुसरा कोणी नृपती सैन्य घेऊन आल्यानंतर भूलोकमल्लासोबतच्या युद्धात तोही मारला गेला. ...